नागपूर – येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात दुसरे दिवशी मध्य प्रदेशच्या संघाला पहिल्या डावात ८१ धावांची आघाडी घेता आली. सलामीवीर हिमांशु मंत्रीने केलेल्या शतकाने (१२६ धावा, १३ चौकार, १ षटकार) मध्य प्रदेशच्या डावाला आकार आला. त्याला सारांश जैन (३०), सागर सोळंकी (२६) आणि हर्ष गवळी (२५) यांनी साथ दिली.
Vidarbha move to 13/1 at stumps on Day 2, after bowling out Madhya Pradesh for 252.
Himanshu Mantri’s superb 126 helped the visitors take an 82-run lead.@IDFCFIRSTBank | #VIDvMP | #RanjiTrophy | #SF1
Scorecard ▶️ https://t.co/KsLiJPuYMZ pic.twitter.com/4aN19Etl8f
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2024
सलामीवार यश दुबे (११) खेरीज कोणालाही टिचून खेळता आले नाही. मध्य प्रदेशचे सहा फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. विदर्भाकडून उमेश यादवने ४० धावांत तर यश ठाकूरने ५१ धावांत असे प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय अक्षय वाखरेने ६८ धावांत दोन आणि आदित्य सदावर्तेने ४८ धावांत १ विकेट घेतली. सागर सोळंकी धावबाद झाला.
कालच्या १ बाद ४७ धाव्संख्येवरुन पुढे खेळताना मध्य प्रदेश आज मोठीआघाडी घेईल, असा अंदाज होता. मात्र, हिमांशु मंत्री वगळता मध्य प्रदेशच्या फलंदाजांना विदर्भच्या गोलंदाजांचा सामना करणे कठिण जात होते. हिमांशुने सारांश जैनसमवेत ७३, हर्ष गवळीबरोबर ६१ आणि सागर सोळंकीबरोबर ५२ धावांची भागिदारी केली. दिवस संपत असताना विदर्भाने आपल्या दुस-या डावात १ बाद १३ धावा केल्या आहेत. सलामीवीर अथर्व तायडे लवकर तंबूत परतला.