चेन्नई : मुंबईच्या संघाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून चेन्नईतील एम ए चिंदमबरम स्टेडियमवर तामिळनाडू संघाशी चारदिवसीय लढत सुरू झाली आहे. मुंबईने पहिल्या दिवसअखेर ८९.४ षटकांत ६ बाद २८४ धावा अशी मजल मारली आहे.
WATCH: Shams Mulani's gritty 87 guides Mumbai to 284/6 at stumps on Day one against Tamil Nadu.
Watch his innings 👉👉https://t.co/4WrSUDlsHV#TNvMUM #RanjiTrophy @paytm @MumbaiCricAssoc pic.twitter.com/LWmfKS2iLt
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2020
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मुंबई संघाची सुरूवात चांगली झाली नाही आणि त्यांची ४८.५ षटकांतच ५ बाद १२९ अशी स्थिती झाली होती. जय बिस्टा ४१, भूपेन लालवाणी २१, सिध्देश लाड ०,हार्दिक तामोरे २१, सर्फराज खान ३६ धावा काढून बाद झाले.
त्यानंतर शम्स मुलानी आणि आदित्य तरे यांनी मुंबईचा डाव सावरत सहाव्या विकेटसाठी १५५ धावांची भागिदारी रचली. शम्स मुलानी ८७ धावांवर बाद झाला.तामिळनाडूकडून आर आश्विन आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
शम्स मुलानी बाद होताच पंचानी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला.खेळ थांबला तेव्हा अादित्य तरे हा ६९ धावांवर खेळत होता.