Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, तो 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आयोजित शिबिरात केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड –
आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले.
दरम्यान, येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण देशभरात या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांचे प्रभू श्री राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित,ज्योत निष्ठेची या शिबिरातून #Livehttps://t.co/f0l1PqvJ5k
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024