Bharat Ratna : कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.त्यांनी दिलेल्या सर्वोत्तम योगदानासाठी त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारत रत्न’ देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी एक ट्विट करत याबाबतचे आपले सविस्तर म्हणणे मांडले आहे.
आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात,”माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. ”
ठाकरे पुढे म्हणतात,”बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं”
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असही राज ठाकरे यांनी म्हंटल आहे.
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या शनिवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारतर्फे देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.