तिनही धरणांत अत्यल्प साठा
राजगुरूनगर- खेड तालुक्यात पावसाचा अजूनही लपंडाव सुरू असून तालुक्यातील धरणांमधील साठा अत्यल्प असून यंदा तालुक्यातील धरणे भरणार का, असा प्रश्न आता सगळ्यांनाच सतावत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे; मात्र खेड तालुक्यात पावसाने अजूनही दडी दिल्याने चास कमान, कळमोडी आणि भामा आसखेड धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तालुक्यातील तीनही धरणे यावेळी भरली होती तर तालुक्यातील भीमा, भामा आरळा या तीनही नद्या दुथडी भरून वाहत होत्या. गेली अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तालुक्यात इतका कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील तीनही धरणात अत्यल्प पाणी साठा आहे.
- भात पिकांना फटका
खेड तालुक्यात यंदाअत्यल्प पाऊस पडल्याने भात पिकांना फटका बसला आहे. गेली दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे भीमाशंकर परिसरात पावसाचा नसल्याने धरणात पाणीसाठा होत नाही. चास कमान धरणातील पाण्यावर खेडसह शिरूर तालुकाही अवलंबून असतो तर भामा आसखेड धरणाच्या पाण्यावर खेडसह आळंदी, एमआयडीसी आणि पुण्याचा काही भाग अवलंबून असल्याने ही धरणे भरणे गरजेचे आहे; मात्र पावसाचा जोर कमी असल्याने धरणे उशीरातरी भरतील अशा आशा नागरिकांना आहेत. - धरण..पाणी पातळी (मीटर)… पाणीसाठा (दलघमी.)…उपयुक्त पाणीसाठा (दलघमी.)… टक्केवारी… आतापर्यंतचा पाऊस (मिमी.)
चास कमान…635. 81…71.36…44.17….20.59….400
भामाआसखेड…662.45….114.76….101.24….46.63….383
कळमोडी….679.90…26.26…26.06…61.07…457