विश्रांतवाडी – संततधार पावसामुळे कळसमधील यशवंतनगरी येथील 50 ते 60 घरांना फटका बसला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात अनेकांचे चीजवस्तूंचे नुकसान झाले.
दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसारण्यास तयार नसल्याचे चित्र असून गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 71 मी, पानशेत वरसगाव धरणात 134 मिमी तर टेमघर धरानात तब्बल 176 मिमी पाऊस झाला असून टेमघर धरणही 95 टक्के भरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.