नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली. यानंतर आता राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आडनावावरून करण्यात आलेल्या या निवाड्यानंतर राहुल गांधी यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला. यादरम्यान राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात,”माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे”
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.
मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है। सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन।
– महात्मा गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 23, 2023
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यापूर्वी तब्बल तीन वेळा कोर्टात हजर होते. ऑक्टोबर 2021 मध्ये ते शेवटचा आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हंटले होते.