नवी दिल्ली – करोना लसची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. इतर देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी अधिकृत परदेशी निर्मित कोविड -19 लस भारतात आयात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील लसीबरोबरच आता परदेशी लसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
“सरकारनं विरोधी पक्षांच्या सूचना टीका आहेत असं समजून नाकारू नये ही समृद्ध लोकशाहीची परंपरा आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी परदेशी फार्मा कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता. काही भाजपच्या काही मंत्र्यांनी राहुल यांच्यावर टीका केली. पण चार दिवसांनी सरकारने राहुल गांधींचाच सल्ला मानला,” असं म्हणत संजय निरुपम यांनी सरकारवर निशाणा साधला. निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
समृद्ध लोकतांत्रिक परंपरा यही है कि सरकारें विपक्ष के सुझावों को आलोचना कहकर ठुकराए नहीं।
हमारे नेता राहुल गांधी ने विदेशी फ़ार्मा कंपनियों के #vaccine को मंजूरी देने की सलाह दी थी।
कुछ मंत्री आदतन उन पर टूट पड़े।
चार दिन बाद सरकार ने राहुल जी की सलाह मान ली।#COVIDSecondWave— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 14, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले की, परदेशी निर्मित लसींच्या पहिल्या 100 लाभार्थ्यांच्या आरोग्यावर सात दिवस नजर ठेवली जाईल, त्यानंतर या लसींचा वापर देशात लसीकरण करण्यासाठी केला जाईल.