नवी दिल्ली – भारतची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकाविले. तिचे हे कारकिर्दीतील दुसरे ऑलिम्पिक पदक ठरले.
याआधी तिने रिओ 2016च्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक आपल्या नावे केले होते. दरम्यान सिंधूच्या टोकियो स्पर्धेतील यशाने देशभरात तिचे कौतुक करण्यात आले.
ती भारतमध्ये आल्यानंतर काही दिवसातच तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले, ती आपल्या कुटूंबासोबत बालाजी दर्शनास गेली आहे. तिने आपल्या ट्विट एक कुटूंबीय समवेतचा फोटो शेअर केला करत ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले, ऐतिहासिक मंदिरमध्ये एक प्रकारची ऊर्जा अनुभवली, असे तिने लिहिले आहे.
Enjoyed the darshan of lord Venkateshwara at the Tirumala Tirupati devasthanam . The beautiful, historic aura of the temple, made the experience even better.🙌🏽🙏🏼😊 pic.twitter.com/TaLrbG3ANE
— Pvsindhu (@Pvsindhu1) August 13, 2021
टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15असा पाडाव केला.
तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये11-8 अशी आघाडी घेतली.