नवी दिल्ली: प्रवासी कामगारांना घरी नेण्यासाठी कॉंग्रेस आणि यूपीच्या योगी सरकारमधील संघर्ष बुधवारीही कायम राहिला. आपण राजकीय भूमिकेत अडकून लोकांच्या मदतीत अडथळा आणू नये. जर तुम्ही दुपारी चार पर्यंत बसेसला परवानगी दिली नाही तर आम्ही या बस परत बोलावू, असे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी यूपी सरकारला स्पष्टपणे सांगितले.
प्रियंका गांधी म्हणाल्या, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये , तुम्हाला जर या बसांवर आपला झेंडा लावायचा असेल तर लावा पण लोकांना त्रास होऊ नये.
कॉंग्रेस नेते म्हणाले, ‘यामागे आमची सेवेची भावना आहे. आम्ही गाझियाबाद सीमेवर 500 बस उभ्या केल्या. काल आम्ही राजस्थान-यूपी सीमेवर 900 बसेस आणि उर्वरित गाझियाबाद-दिल्ली-यूपी सीमेवर उभ्याआहेत. आम्ही सबची नवीन यादी देण्यास तयार आहोत.