मुंबई : करोनाचे उच्चाटन नजिकच्या भविष्यात होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे त्यापासून सावध रहा. त्याचवेळी करोना हा आता जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेऊन जनतेत जागृती करण्याची गरज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या आणि देशाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या पवार यांनी व्यक्त केलेली भावना महत्वाची मानली जात आहे. जपानमध्ये नागरिक त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग म्हणून मास्क वापरतात. आरोग्यपूर्ण राहण्याची सवय त्यांनी लावून घेतली आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यांच्याशी विचार विनिमय केल्याच्या दुसऱ्या दिवशी पवार यांनी हा सल्ला दिला आहे. राज्यातील स्थितीबाबत मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनासमोरील आव्हाने प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची माहिती घेतली.
नागरिकांनी ग्लोव्हज आणि मास्क वापरावेत, सॅनिटायझरचा वापर करावा. साबणाने वारंवार हात धुवावेत. त्यामुळे संसर्गापासून आपण दूर रहाल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने करोनापासून बचाव करण्याच्या उपायांची माहिती देशात सर्वत्र द्या असे ते म्हणाले.