वाल्हे (प्रतिनिधी) : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे- मिरज लोहमार्गावर, वाल्हे- नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील, रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वेफाटक मंगळवार (दि.३०) सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत (१२) तास वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रसिद्धीपत्रका द्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांनी, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे – पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी मंगळवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ०८ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने , प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, रेल्वेगेट जवळ फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून, सोमवारी सकाळी हे फ्लेक्स बोर्ड या रेल्वे गेटवर लावण्यात आले आहेत.
रविवारी दुपारनंतर सोशल मीडियावर रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याची पोस्ट फिरत होती. यासंदर्भात, रविवारी रात्री उशिरापर्यंत वाल्हे रेल्वे स्टेशन, वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयास याबाबत विचारता केली असता, असे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगण्यात आले होते.
पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद ठेवण्या संदर्भातील पञ वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयास सोमवार देण्यात आले असून, या पञामध्ये मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ८ (१२) हे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे दिले असून, रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेगेट जवळ लावलेल्या फ्लेक्सवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत (१०) तास रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. असे दिले असल्याने, प्रवाशी तसेच ग्रामस्थांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
दरम्यान, सोमवारी वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयास यासंदर्भातील पञ, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, ऐन गणपती सणांच्या निमित्ताने गावी जाणा-यां प्रवाशांना या पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, आता जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे येऊन पुढिल प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा सर्व प्रवाशांना पडणार आहे.
जुलै महिन्यातही ऐन आषाढी एकादशीच्या तीन दिवस आगोदर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे फाटक मार्गात काम करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. यावेळीही पंढरपूरला याञेनिमित्त जाण्या-या भाविकांना ४० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागले होते. तसेच यावेळीही गणपती सणांच्या आदल्या दिवशीच रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, रेल्वे प्रशासनावर प्रवाशी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत असून, या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी निरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा. असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.