शासनाकडून फक्त घोषणाच : उपाययोजनांच्या नावाने बोंब
चार्याअभावी पशुधन विक्रीची बळीरावर वेळ
वाल्हे – पुरंदर तालुका दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करून जवळपास दोन महिने उलटून गेले असले तर अद्यापपर्यंत, पशुधनासाठी शासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. येत्या काही दिवसांत चारा छावणी, चारा डोपो सुरू झाले नाहीत तर पशुपालकास नाइलाजास्तव पशुधन विक्रीस काढावे लागेल; अशी संतप्त भावना पशुपालक व्यक्त करीत आहेत.
पुरंदर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये यावर्षी पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाली होती. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुधन सांभाळणार्या शेतकर्यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे चारा मिळेल का चारा ? याबाबत विचारणा करण्यात येत होती. मात्र, हिरवा चाराच उपलब्ध होत नसल्याने, पशुपालक पशुविक्री करित असल्याचे ग्रामीण भागात दिसत आहेत.पुरंदर तालुक्यात अनेक पशुपालक जनावरे जागविण्यासाठी, चारा म्हणून जनावरांना ऊस देत आहेत. दुसरे कोणतेही हिरवी पिके जनावरांच्या चार्यासाठी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे.
दावणीला पशुधन कसे उपाशी ठेवायचे?
सद्यःस्थितीत पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांतील जनावरांना हिरव्या चार्यांची तीव्र टंचाईची निर्माण झाली असून पशुधन आपल्या दावणीला उपाशी कसे ठेवायचे ? यामुळे वाटेल ती किंमत मोजून, मिळेल त्या तालुक्यातून, हिरावा चारा उपलब्ध करण्यासाठी पशुपालक धडपडत आहेत.
अनेक गावांतील पशुपालकांनी मागील काही महिन्यांपूर्वी पाण्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांना हिरवा केला होता. मात्र, पुढील काळात पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाल्याने अनेकांनी मुरगाघ तयार केला. मात्र, मुरगाघास, तयार करताना, पाण्याअभावी पिकांची योग्य वाढ न झाल्याने कमी प्रमाणात चारा उपलब्ध झाला होता. तसेच तयार केलेला मुरघास आता संपुष्टात आला आहे.
– जयवंत भुजबळ, पशुपालक वाल्हे
शासनाकडून चारा छावणी, चारा डोपो त्वरित सुरू करावेत; पशुपालकांच्या बँक खात्यात पैसे पाठवू नयेत; जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा; बँक खात्यात पैसे पाठवले तर, जनावरांना हिरवा चारा कुठून उपलब्ध करणार? जनावरांना पैसे खायला घालणार का?
– धनंजय गायकवाड, पशुपालक वाल्हे.