राजगुरूनगर : लॉकडाऊनच्या काळात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर कडक धोरण राबविले होते. मात्र हे नियम न पाळणाऱ्या जिल्ह्यातील १३ तालुक्याच्या ग्रामीणभागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ६ हजार ७९९ लोकांवर कारवाई करून २० लाख ४७ हजार १५० रुपये दंड जमा झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1278737462465956/
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने करोना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. घर बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले होते. याबरोबरच सोशल डिस्टन्स ठेवावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. हे करणाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दंडात्मक आदेश देण्यात आले होते. याबाबत अगोदर जनजागृती करण्यात आली होती. मात्र तरीही याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायतीने कारवाई केली.
जिल्ह्यात ७ हजार व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्या कारवाईत २० लाख ४७ हजार दंड वसूल केला आहे. ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा, तोंडावर मास्क लावावा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी केले आहे .
यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितले कि, खेड आंबेगाव तालुक्यात करोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णाची संख्या लक्षात घेता.ओझर आणि लेणाद्री मध्ये सीसीसी ची सुविधा उपलब्ध केली आहेत स्वब घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तज्ञ् डॉक्टर उपलब्ध केले आहेत. खेड आंबेगाव जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड सेंटर मध्ये ऑक्सिजनची सोय केली आहे.
खेड, म्हाळुंगे येथे १४०८ खाटांचे नियोजन केले आहे. २७ खाजगी दवाखान्यात करोनाबाधितांवर सर्व प्रकारचे उपचार केले जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. ओझर मध्ये सीसीसी तयार करण्यात आले आहे. ओझर देवस्थान ने मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले असून विघ्नहर सहकारी कारखान्याने मदत केल्याने येथे २५० बेड ची सोय होणार आहे. लोक सहभागातून मदत करणाऱ्या सर्व सेवाभावी संस्थांचे जिल्हा प्रसाद यांनी आभार व्यक्त केले.
मास्क न वापरणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर केलेली कारवाई तालुकानिहाय व्यक्ती आणि कंसात दंडाची रक्कम पुढील प्रमाणे
आंबेगाव ३९२(१,९५,५००), बारामती ५७३ (१,४६,८००), भोर १०२ (५१,०००), दौंड ८७४ (२,३६,०००), हवेली १७८२ (२,११,५००), इंदापूर ८९९ (२,७६,६००), जुन्नर ४५६ (९१,२००), खेड ११० (५५,०००), मावळ १२३ (६१,५००), मुळशी ५४० (२,७०,०००), पुरंदर ३८१ (१,६९,०००), शिरूर ४३५ (२,१७०५०), वेल्हे १३२ (६६,०००),