प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने 10 मार्गांवरील मोठ्या बस पर्यायी रस्त्यांनी वळवल्या. पण, त्या बदल्यात 9 मीटरच्या केवळ चार “पुण्यदशम’ बस या मार्गावर पाठवल्या आहेत.
शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर पुण्यदशमच्या 20 बस धावत होत्या आणि इतर मार्गावरील 12 मीटरच्या 40 बस धावत होत्या. यातून सुमारे 35 हजारहून अधिक प्रवाशी करत होते. या 10 मार्गांवरील बसचा मार्ग बदल्यानंतर या मार्गावर बसची संख्या वाढविणे अपेक्षित होते. पण पीएमपी प्रशासनाने केवळ 9 मीटरच्या चारच बस वाढविल्या आहेत. या चार बसच्या अतिरिक्त 126 फेऱ्या होणार आहे. पण, या बसची वहन क्षमता 12 मीटर बसच्या निम्मीच आहे. त्यामुळे या मार्गावरील अतिरिक्त प्रवाशांचा भार या चारच बस कसा पेलणार? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
या मार्गावरील दररोजच्या प्रवाशांची गैरसोय होत असून मोठ्या बस पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.