पुणे – आता गुलाबी थंडीचा आस्वाद घेणे दुरापास्त झाले असून, स्वच्छ शुद्ध हवा प्रदूषणामुळे आता घातक झाली आहे. त्यामुळे ही थंडी नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांत वाढलेले वायुप्रदूषण, विषाणूंचे वेगाने बदलणारे स्वरूप, बदलती जीवनशैली यामुळे व्हायरल फिव्हरचा त्रास अनेकांना सुरू झाला आहे. केवळ ताप येणे असे या आधी होत होते. मात्र, आता विषाणूंच्या बदलत्या स्वरूपामुळे अनेकविध लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्यामध्ये तोंड येणे (तोंडात पुरळ येणे), अंगाला खास सुटणे असे प्रकारही दिसून येत आहेत.
तसेच मायाेजिया म्हणजे जसे चिकुनगुन्यामध्ये जाॅइंट पेन म्हणजे सांधेदुखी हाेते, त्याप्रमाणेच व्हायरल फिव्हरनंतर हाताचे जाॅइंट, स्नायू दुखणे असे प्रकार होत असून, ते आठ-दहा दिवसांत कमी होण्याऐवजी ते बराच काळ दुखण्याचा प्रकार दिसून येत आहे. हे दुखणे महिन्यापेक्षा जास्त काळ दिसून येते.
उपाय
सकाळी गारठा जास्त असल्याने हा त्रास सकाळी जास्त जाणवतो. त्यामुळे शक्यतो उबदार कपडे घालावेत. वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत. त्याऐवजी शेक घ्यावा. हे दुखणे दीर्घकाळ राहू शकते.
माझ्या क्लिनिकला दरराेज सर्दी खाेकल्याचे १७ ते २० पेशंट येतात. सर्दी तीन ते चार दिवसांत जाते, मात्र खाेकला २० ते २५ दिवस राहताे. सगळ्या प्रकारची औषधे वापरूनही खाेकला फार काळ राहताे. त्यासाठी दीर्घकाळ कफ सिरप घेऊ नये. कारण सिरफचा दुष्परिणाम हाेऊ शकताे. त्याऐवजी सूंठ, हळद यांचा काढा घ्यावा. सध्या हा काॅमन व्हायरल इन्फ्लुएंझा आहे. ऑक्टाेबर ते एप्रिल दरम्यान याचा प्रादुर्भाव राहील. त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार हाेत आहे. तूर्तास काळजी घेणे आवश्यक आहे.
– डाॅ. अल्पना बापट, जनरल प्रॅक्टिशनर, शनिवारपेठ