बिबवेवाडी – तळजाई टेकडीवर येण्यासाठी मुख्य रस्त्यासह अन्य चार ते पाच रस्ते आहेत. तसेच, संरक्षक सीमाभिंत फोडून टेकडीवर येण्यासाठीही काही रस्ते करण्यात आले आहेत. वनपरिसरात फिरण्यासाठी नारिकांनीही पायवाटा पाडल्या आहेत. यातून अशा रस्त्यांवरून येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवेण वनविभागाला अवघड जात आहेत.
तळजाई वनपरिसरात येण्या-जाण्यासाठी वनवाटा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उन्हाळ्याचा ऋुतु सुरू झाला की पानगळ होऊ लागते. यामुळे वनपरिसरात येणाऱ्यांची संख्या वाढते. यातून वन्यप्राण्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे.
उन्हाळ्यात पहाटे चार वाजल्यापासूनच टेकडीवर नागरिकांची लोकांची वर्दळ सुरू होते, सकाळी अकरापर्यंत नागरिकांची वर्दळ कमी होते. सुट्टीच्या दिवसासह शनिवार-रविवारी टेकडीवर मोठी गर्दी असते. हे नागरिक आपल्या सोयीनुसार हव्या त्या ठिकाणी “मुक्तसंचार’ करीत असतात. या कारणातूनही वनपरिसरात पायवाटांचे प्रमाण वाढले आहे. तळजाई टेकडीवर वन्यप्राणी, पक्षी दिसणारी चार-पाच ठिकाणे आहेत. परंतु, काही वन्यप्रेमी स्वत:ची नवी ठिकाणं शोध्याच्या प्रयत्नात वन परिसरात सर्वत्र फिरत असतात, यामुळेही पायवाटा तयार झाल्या असल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.