मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी ‘टायगर- 3′ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान अनेकदा त्याचे चित्रपट, बॉलिवूडबद्दल वक्तव्य करतो. त्याची ही वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच सलमान खानने हिंदी सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरुपावर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने मुंबईत एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी सलमानने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या बदलत्या स्वरूपाविषयी आपले मत व्यक्त केले.
तो म्हणाला की.., “ज्यांना असं वाटतं की भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान आहे, त्यांनी खरा भारत समजून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत या लोकांना खरा भारत समजत नाही, तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये खरा भारत देश कसा दिसेल?” असं सलमान खान यावेळी म्हणाला.
दरम्यान, अभिनेता सलमान खान लवकरच तेलुगू मेगास्टार चिरंजीवीसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. “गॉडफादर’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. मात्र, हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.