पुणे ग्रामीण – आंबेगाव तालुक्यातील मंचर आणि कळब (Manchar kalamb) परिसरात रविवार (दि. 26) दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस (Heavy rain) झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाले असून द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता शेती तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. (Weather News)
मंचर ,कळब, चांडोली परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे तरकारी पिकाचे तसेच इतर पिकांची नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासूनच ढगाळ वातावरण होते .पाऊस पडण्याची शक्यता हवामान खाते वर्तवित होते. त्याचा प्रत्यय रविवार दुपारी तीन वाजता आला. (Pune rural news)
मंचर येथे रविवारचा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे सर्वसामान्यांची चांगलीच धावपळ झाली. तसेच मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या तरकारी पिकांचे काही प्रमाणात पावसामुळे नुकसान देखील झाल्याचे समोर आले.
अवकाळी पावसामुळे येथून मागील काळातही शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा काढणी तसेच बटाटा काढणे सुरू आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत.