जेजुरी (ता. पुरंदर) : येथे झालेली वाहतूक कोंडी.
जवळार्जुन – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत सतत यात्रा जत्रा उत्सव सुरू असल्याने त्याबरोबरच जेजुरी औद्योगिक वसाहत यामुळे रविवारी (दि. 10) पुणे-पंढरपूर मार्गाबरोबर मोरगाव-जेजुरी रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यात ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली होती. मोरगाव, नीरा, सासवड रस्त्यावर वाहनांचा किमान दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
जेजुरी गडावरील उत्सव, शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात गुरुवारी जेजुरीच्या बाजारात होणारी गर्दी यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. जेजुरीत वर्षाकाठी साधारणपणे 12 यात्रा भरतात. वर्षभरात 65 लाख अधिक भाविक येथे येत असतात. तर दर रविवारी व मार्च ते जून य कालावधीत हजारो भाविकांची जेजुरीत गर्दी असते. या काळात मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. वाहतुकीची कोंडी होते. रस्ता पार करणे देखील अवघड होवून बसते. अशातच आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी कर्णाचे काम जेजुरी पर्यंत आले आहे त्यामुळे जेजुरीपर्यंत वाहन जोरात येतात व वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
जेजुरी शहरातून जाणार्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जेजुरीकारांचा विरोध असून नगरपालिके पासून ते राष्ट्रपती पर्यंत नागरिकांनी निवेदने देवून विरोध केला आहे. इतर गावां प्रमाणे जेजुरी शहराच्या बाहेरून रस्ता करावा, ज्या भाविकांना जेजुरीत देवदर्शनासाठी यायचे आहे त्या भाविकांची वाहने शहरात येतील तसेच मोरगाव, बारामती,नीरा,लोणंद,सातारा कडे जाणारी वाहने बाह्यवळण मार्गाने गेल्यास जेजुरी शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
” ही वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातून जाणारा नियोजित राष्ट्रीय महामार्ग जेजुरी शहरांमध्ये उड्डाण पूल आणि बाह्यवळण करावे.” -जयदीप बारभाई, माजी विरोधी पक्ष नेते, जेजुरी नगर परिषद.