पिरंगुट – लवासा येथील गडले – दुधवान (ता. मुळशी) येथे बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. मोसे खोर्यातील सह्याद्रीच्या परिसरात वाघाचा वावर होत असल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी विठ्ठल मरगळे यांनी शुक्रवार (दि.८) सकाळी गायी म्हशींसह सर्व जनावरे रानात चरायला सोडली होती. त्याच दिवशी सकाळी अकराच्या सुमारास वासरू हंबरडे फोडत असल्याचा आवाज गावातील काही महिलांनी ऐकला होता.
त्याच संध्याकाळी वासरे घरी परत आले नाही म्हणून मरगळे रानात वासराला शोधण्यासाठी गेले होते. त्याचवेळी हल्ल्यात वासरू मृत्युमुखी झालेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे पशुधनाची होणारी नुकसानी बाबत वनविभागाने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी व वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक होत आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकारी कल्याणी रो माचा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, शेतकरी विठ्ठल मरगळे यांच्याकडून खात्रीशीर माहिती घेऊन पंचनामे करू, असे त्यांनी सांगितले.