पुणे : पुण्यातील अर्हम कला आणि वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच “भारतातील सेवा क्षेत्रातील क्रांती” विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या परिषदेला मान्यवरांची उपस्थिती लाभली.
दि.२० ते २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन दिवसीय “भारतातील सेवा क्षेत्रातील क्रांती” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद अर्हम कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते. पहिल्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे परिषदेचे प्रमुख पाहुणे होते, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुधाकर जाधवर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्याीठातील विपणन शास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. अन्वर शेख हे अतिथी होते. प्रा.इंद्रजित केंद्रे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्राचार्य डॉ.सतिश भोसले सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून संस्थेच्यावतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अर्हम फाऊंडेशनचे संचालक डॉ. आतिश चोरडिया, अर्हम संस्थेचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख व सदस्य श्री.स्वराज पगारिया यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ.अन्वर शेख सरांनी परिषदेचे महत्त्व आणि पेपर सादरीकरणाचे फायदे यावर प्रकाश टाकला. जाधवर सरांनी उपस्थित प्राध्यापकांना यशस्वी व्यक्तीच्या काही प्रेरणादायी कथा सांगितल्या. प्राध्यापक डॉ. पराग काळकर यांनी चर्चासत्राचे महत्व पटवून दिले. तर डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
तर दुसऱ्या दिवशी प्रा.प्रसाद तिकोने यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे सह-अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे यांचे स्वागत केले. तसेच प्रा.रसिका पगारिया यांनी पूना महविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक अधिकारी डॉ. सय्यद वकील यांचे स्वागत केले. डॉ.मिठारे सरांनी स्टार्ट अप इंडिया या विषयावर भाषण केले व माननीय सय्यद यांनी आपला शोधनिबंध कसा तयार करावा व तो शोध पेपर कसा सादर करवा याबाबत मार्गदशन करून परिषदेत याबाबत विधायक मांडला. परिषदेत अर्हम महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक यांनी आपले शोधनिबंध सादर केले. राष्ट्रीय परिषदेत एकूण ४४ लोक उपस्थित होते. प्रा.कैलास नगारे यांनी आभार मानले. समारोह राष्ट्रगीताने करण्यात आली.