Lok Sabha Election 2024 । उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत यावेळी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने शनिवारी जारी केलेल्या आपल्या 15 व्या यादीत या मतदार संघाची उमेदवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना देण्याची घोषणा केली. निकम यांचा सामना महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे. निकम यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतितटीची लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाचे उमेदवार जरी असले तरीही ती जागा महाविकास आघाडी जिंकेल”असा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले,’माझ्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या अनेक नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणीही उमेदवारी घेण्यास तयार नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. आता या मतदारसंघात नक्कीच चांगली लढत होईल”, असा टोला राऊत यांनी महायुतीला लगावला.
ते पुढे म्हणाले,’उत्तर मध्य मुंबईत वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षणाला महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल’ असा म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
Lok Sabha Election 2024 । उमेदवारी नाकारण्याची प्रमुख कारणे –
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्याचे काही कारणे सांगितले जात आहेत. त्यानुसार, पूनम महाजन यांनी आपला जनसंपर्क पूर्णतः बंद केला होता. त्या काही निवडक कार्यक्रमांसाठीच आपल्या कार्यालयाबाहेर पडत होत्या. त्यांनी भाजपचे नेते किंवा कार्यकर्त्यांपासून अंतर राखले होते. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष होता.
यापूर्वी ठाकरे कुटुंबांशी संपर्क साधण्यासाठी पूनम महाजन भाजपसाठी महत्त्वाच्या ठरत होत्या. पण आता ठाकरे कुटुंब व भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळे त्यांची उपयुक्तता संपुष्टात आली होती, अशी काही कारणे सांगितली जात आहेत.
Lok Sabha Election 2024 कोण आहेत उज्ज्व निकम ?
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईवर 26/11 चा अतिरेकी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह, 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्याकांडा व प्रमोद महाजन हत्याकांडासारखे अनेक हायप्रोफाईल खटल्यांत सरकारतर्फे यशस्वी युक्तिवाद केला आहे. त्यांनी भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
हे वाचले का ? आपसोबत युती केल्याने दिल्लीत काँग्रेसला गळती, अरविंदर सिंग लवली यांनी सोडले अध्यक्षपद