पुणे – महापालिकेने स्थापन केलेली “मराठी भाषा संवर्धन समिती’ कागदावरच असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्यासंबंधात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे. मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महापालिकेने ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली असून साहित्यिक उपक्रमाला गती देऊ शकले नाहीत, असा आरोप मनसेने केला आहे. मनसे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शहर सचिव रमेश जाधव, शहर सचिव रवी सहाणे यांच्या शिष्टमंडळाने नेतृत्त्वाखाली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार, मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी मराठा भाषा संवर्धन समितीची स्थापना 2012 साली करण्यात आली. महापालिकेने ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली दिसतात. साहित्यिक उपक्रमाला अद्याप गती देऊ शकले नाही. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी मराठी भाषेच्या संदर्भात उदासीन असल्याचे दिसते, असे मनसेचे म्हणणे आहे.