इंदापूर – इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांसाठी व शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी बैठकीत केली.
यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन आमदार भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री पवार यांनी दिली.