अकलूज – आपण केलेले मतदान आपल्या पसंतीच्याच उमेदवाराला मिळाले असल्याची खात्री देणारे इव्हीएम., व्हीव्हीपॅटबाबत जनजगृती मोहीम शंकरनगर येथे प्रात्यक्षिकाद्वारे राबवण्यात आली.
आगामी काळत होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातील मतदान यंत्राबाबतच्या शंका, गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने निवडणूक आयोग व तहसील कार्यालय यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ सरपंच वर्षा सरतापे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी सदर प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला.
माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या प्रत्येक गावांमधून दोन पथकांच्या माध्यमातून चार गट सलग एक महिना जनजागृती मोहीम राबवत आहेत. मतदान यंत्राबाबत मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी राबविण्यात येणार्या शासनाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेऊन आपण दिलेले मत आपल्या पसंतीच्याच ऊमेदवाराला मिळणार का याची खात्री करावी,
असे अवाहन प्रात्यक्षिक अधिकारी दिनानाथ मोरे, लक्ष्मण बिरादार यांनी केले. यावेळी अकलूज विभागाचे मंडलधिकारी चंद्रकांत भोसले, तलाठी नवनाथ मोरे, माळेवाडी तलाठी संजय माने, तलाठी कार्यालयातील कर्मचारी प्रविण गोडसे, विठ्ठल माने आदी उपस्थित होते.