तहसीलदारांना निवेदन :पीडित कुटुंबीयास न्याय मिळण्याची मागणी
इंदापूर – लातूर जिल्ह्यातील वलांडी (ता. देवणी) येथील पीडित कुटुंबीयास तात्काळ न्याय मिळावा व मदत मिळावी, या मागणीसाठी इंदापूर शहरातील सकल हिंदू खाटीक समाजाने इंदापूर शहरातून इंदापूर प्रशासकीय भावनावर तहसील कार्यालयावर मुख्य बाजारपेठेतून (दि. 2 फेब्रुवारी) मोर्चा काढला तब्बल सहा मागण्यांचे निवेदन यावेळी इंदापूर तहसीलदारांना देण्यात आले. काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.
यावेळी इंदापूर शहरातील व तालुक्यातीलसामाजिक संघटनांनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या मूक मोर्चाला पाठिंबा देत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
इंदापूर संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णाजी ताटे, उद्धव बाळासाहेब ठाकरेयांच्या शिवसेनेचे महादेव सोमवंशी, ओबीसी नेते पांडुरंग शिंदे, माजी नगरसेवक अनिल राऊत, सोमनाथ पवार, बंडा पाटील आदी कार्यकर्त्यांनी सहभागी होत पाठिंबा दर्शवला.