पुणे – शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
शहरातील दुकाने रात्री आठ तसेच उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाने मुभा देण्यात आली आहे. सोमवारी (९ ऑगस्ट) रात्री अकरानंतर शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत रात्री अकरा ते पाच पहाटेपर्यंत संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहे.
शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी कळविले आहे.