मुंबई : कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर राज्यातील खाजगी दवाखाने फक्त तीनच तास सुरु राहणार आहेत. खाजगी डॉकटरांच्या सुरकक्षेच्या मुद्यावरून निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी डॉक्टरांना अद्यापही सोयी सुविधा नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे इंडियन मेडिकल असोशियनचं म्हणणे आहे.
डॉक्टरांना पीपीई किट, 95 मास्क आणि सॅनिटायझर्स मिळत नसल्याने तसेच इतर कारणांमुळे दवाखाने बंद राहणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत दवाखाने बंद ठेवणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकार आणि आयएमएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांनी आपल्या सोयीनुसार दिवसातून कुठल्याही वेळेत तीन तास दवाखाने सुरू ठेवावेत, अशा सूचना डॉक्टरांना करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. तसेच डॉक्टरांनी दर्शनी भागात वेळ दर्शवणाऱ्या नोटिसा लावा, अशाही सूचना दिल्या आहेत.