Ghazipur Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात खासगी बसचा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाची बस लग्नाला जात असताना एसटी लाइनच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडला. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून अनेक जण भाजले आहेत. बसमध्ये एकूण 38 जण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बस मऊ येथून एका लग्न समारंभासाठी जात होती.
ही दुर्घटना मर्दाह पोलीस ठाण्याच्या 400 मीटर जवळ घडली. बस एचटी वायरच्या संपर्कात आल्यानंतर बसला आग लागली. पोलिसही घटनास्थळी आहेत. जिल्हा दंडाधिकारी आर्यका अखौरी आणि पोलीस अधीक्षक ओमवीर सिंगही घटनास्थळी पोहोचले आहेत. एसपींनी सांगितले की, ही घटना कशी घडली याचा तपास केला जात आहे. या दुर्घटने किती लोकांचा मृत्यू झाला? हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर दुर्घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. भाजलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिलेत. ( private bus fired)