लखनौ –उत्तर प्रदेशात पूर्वी सत्तेत असलेल्यांना लोकांच्या गरजांची चिंता नव्हती आणि त्यांचा एकमेव अजेंडा राज्याची लूट हा होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी मथुरा, आग्रा आणि बुलंदशहर येथील मतदारांना संबोधित करताना मोदी बोलत होते.
काही लोकांनी पैसा, मसल पॉवर, जातीयवादाच्या जोरावर कितीही राजकारण केले तरी त्यांना जनतेचे प्रेम मिळणार नाही, असा संदेश येथील जनतेनेच दिला आहे. जे जनतेचे सेवक म्हणून काम करतात, त्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते असा आपला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. आपण स्वप्नात भगवान कृष्ण पाहिल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच केले होते. त्यावर भाजपला मिळालेला प्रचंड पाठिंबा स्वप्नात आता कृष्ण येऊ लागल्याची टीकाही त्यांनी केली.