Prasad Lad On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केले आहे. तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो,’ असे आव्हान जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल.त्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.तुमच्या मागचा बोलवता धनी सिल्व्हर ओक आहे कि जालन्यामधील भैय्या फॅमिली आहे हे त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे. | Prasad Lad On Manoj Jarange
तुम्हाला दहा वेळा सांगितलं होत फडणवीसांचे नाव घेऊ नका.. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांचं नाव तुम्हाला सारखं सारख घ्यायला कोण लावतय हे आता जनतेसमोर आलं आहे. असं देखील प्रसाद लाड यावेळी म्हणाले. | Prasad Lad On Manoj Jarange
दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे तुमच्या लक्षात आलं. समाजाच्या नावावर, लेकरू लेकरू करण्याचं बंद करा. समाजाची फसवणूक करू नका. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही असंही लाड यावेळी म्हणाले. | Prasad Lad On Manoj Jarange
नितेश राणे यांचा देखील जरांगे यांनी इशारा
जरांगे पुन्हा पुन्हा आंदोलन का करत आहेत ? असा सवाल नितेश राणे यांना विचारला असता ते म्हणाले,”त्यांची कारण त्यांना माहिती.आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल आहे आणि समाजाने ते स्वीकारलं आहे. आता त्यांच समाधान होत नाही त्याला काय करणार.जरांगे हे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत ? असा सवाल देखील राणे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी जर राजकारण केलं आणि आमच्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप केले तर सागर बंगल्याच्या पुढे एक भिंत आहे ती त्यांना ओलांडणं अवघड जाईल असा इशारा देखील यावेळी नितेश राणे यांनी दिला.