Narendra Modi On Manoj Jarange । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आज प्रचंड आक्रमक झालेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे.
तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. दरम्यान, ते सध्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झालेत.
आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, यावेळी त्यांनी “मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे.
जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे हे कोणाचेही न ऐकता मुंबईकडे रवाना झालेत.
दरम्यान, याचवेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील आरोप केले आहेत. “तुमच्या सत्तेसाठी शेतकऱ्यांचे मुद्दडे पडायला निघालात. पटेल, यादव जाट हा क्षत्रिय समाज तुम्हाला संपवायचं आहे.
तुम्हाला मोठ्या जाती संपवून तुम्हाला छोट्या जाती मोठ्या करायच्या आहेत. उत्तर प्रदेशमधील बौद्ध समाज संपवला, महाराष्ट्रत मुस्लिम समाज संपवला,” असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
फडणवीसांच्या बंगल्याकडे निघालेल्या जरांगेंना नितेश राणेंचा ‘थेट’ इशारा
“फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार” जरांगेंच्या टीकेनंतर भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य