नवी दिल्ली – मुंबईच्या आरे कॉलनीत करण्यात आलेल्या वृक्षतोड प्रकरणी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर आपण कोणतीही प्रतिक्रीया देणार नाही असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तथापी देशातील वनाखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षात 15 हजार चौरस किमी इतकी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. विकास कामांसाठी एक झाड पाडले गेले तर त्याच्या जागी पाच नवीन झाडे लावता येतात असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पर्यावरण रक्षणासाठी नागरीकांनी दिवाळीत फटाके उडवणे टाळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तरीही ज्यांना फटाके उडावयचेच आहेत त्यांनी ग्रीन फटाक्यांचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.