Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. धाराशिव येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषणावेळी ते म्हणाले,’ भाजप नेहमीच म्हणत असत की,’‘हिंदू खतरे में आहे. कसला खतरे में है? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान आहे का? पंतप्रधान कोण आहे? आर्मी प्रमुख कोण आहे? तो ही मुस्लीम आहे का? देशातील सर्वच मुख्य पदे हिंदुंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा?’ असा थेट प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले,’महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेबांच्या चळवळीने समता विचार पुढे आला. तो भाजपला उद्ध्वस्त करायचा आहे. त्यांना मनुवाद सुरू करायचा आहे.असा आरोप प्रकाश आंबेडकर केला.
ते पुढे म्हणाले,’आमचा कोणत्याही धर्माला, देवीला विरोध नाही. आम्ही समता विचार घेऊन पुढे जात आहोत. आरक्षणाच्या माध्यमातून समता सुरू झाली आहे. आम्ही आरक्षणवादी आहे. त्यामुळेच आमचं मत आरक्षणवाद्यांनाच असेही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकावर टीका केली आहे या टीकेवर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.