48 वर्षांपुर्वी प्रभात | आता क्रांती झाली तरच देश तरेल!
मद्रास, ता. 20 – संघटना कॉंग्रेसचे नेते कामराज यांनी असे म्हटले की, आज देशात भ्रष्टाचार माजला आहे, आर्थिक तंत्री निर्माण झाली आहे, राजकीय अप्रामाणिकपणाचा कळस झाला आहे. त्यातून देशाची सुटका व्हावयाची असेल तर क्रांतीच झाली पाहिजे. अशा परिस्थितीत देशाला मार्गदर्शन करणारा महात्माजी सारखा नेता विद्यमान नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
48 वर्षांपुर्वी प्रभात | देशात अन्नधान्य दंगे सुरू
नवी दिल्ली – धान्य न मिळाल्याने भारतातील अनेक भागांत दंगे होऊ लागलेत. सरकारने या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी मागणी कम्युनिस्ट खासदार एस. एम. बॅनर्जी यांनी आज लोकसभेत केली.
48 वर्षांपुर्वी प्रभात | तांदुळ टंचाईने हॉटेले बंद
कन्नानोर – तांदळाच्या टंचाईमुळे येथील काही हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. जास्त दरानेही तांदुळ विकत मिळत नाही.
48 वर्षांपुर्वी प्रभात | पाकिस्तान व इराणच्या संयुक्त धोक्यास तोंड देण्यास भारताची पूर्ण तयारी
नवी दिल्ली – पाकिस्तान व इराणच्या मोठ्या स्वरूपातील शस्त्रास्त्र साठ्यामुळे जी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला तोंड देण्यासाठी संपूर्ण देशाला तयार करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी आज लोकसभेत सांगितली. अनेक खासदारांनी लोकसभेत आज पाकिस्तान व इराणच्या आधुनिक शस्त्रास्त्राच्या साठ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत गंभीर स्वरूपाची चिंता व्यक्त केली.
48 वर्षांपुर्वी प्रभात | सर्व विद्यार्थी संप करतील
पुणे – संपावर असलेल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुण्यातील सर्व कॉलेजातील विद्यार्थी संप करतील, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे रमेश टिळेकर यांनी दिला आहे.