नगर – कॉंग्रेस पक्षात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असे खळबळजनक वक्तव्य नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. विखे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कॉंग्रेसमधून आता कोण बाहेर पडणार, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
खासदार विखे म्हणाले, की कॉंग्रेसचे ठराविक लोकच मलाई खात होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे एकनाथ शिंदे हे निमित्तमात्र ठरले. मात्र शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी अस्वस्थता होती तशीच अस्वस्थता कॉंग्रेसच्या आमदारांमध्येही आहे. इतर पक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील मंत्री देखील त्यांचे काम करत नव्हते. त्यामुळे भविष्यकाळात कॉंग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. राज्यातील जनताही हे पाहील, ही तर सुरुवात असेल. प्रत्येक जण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे. हेच कॉंग्रेसचे दुर्दैव आहे.