नवी दिल्ली – घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बोलतात त्यांच्या पक्षात 2009 मध्ये 12 टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातून होते. आता सद्यस्थितीत भाजपतील 25 टक्के खासदार नेत्यांच्या घरातील आहेत, असा हल्लाबोल कॉंग्रेसकडून करत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच मोदी हे सातत्याने खोट बोलत आहेत. आता जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असेही कॉंग्रेसने म्हटले.
कॉंग्रेसने घराणेशाहीवरून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसने एक ट्वीट केले आहे. यात म्हटले आहे की, भाजपचे 25 टक्के खासदार नेत्यांच्या घरातून आले आहेत. अनेक केंद्रीय मंत्री देखील राजकीय घराण्यांमधून आले आहेत. असं असताना भाजपाने घराणेशाहीवर बोलणं समजण्यापलीकडचे आहे.
कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीवरील टीकेवर निशाणा साधला आहे. मोदींनी घराणेशाही राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचे वक्तव्य केले होते. हेच नमूद करत कॉंग्रेसने 2009 पासून आजपर्यंतच्या भाजपामधील घराणेशाहीची आकडेवारी जाहीर केली आहे.
कॉंग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 2009 मध्ये भाजपात 12 टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील होते. हे प्रमाण वाढून आता सद्यस्थितीत 25 टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील आहेत.