पुणे – “माझी वसुंधरा’ अभियानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री आदित्य ठाकरे आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने “माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या कामगिरी बद्दल सूरज मांढरे यांचा गौरव करण्यात आला.