पुणे – पीएम केअर्स फंडमध्ये किती निधी गोळा झाला, त्याचा कशा प्रकारे वापर केला, याची माहिती जनतेलाच मिळत नाही. वास्तविक राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी “पीएम केअर्स फंड’ ची घोषणा करण्यात आली असून, हा फंड माहिती अधिकाराच्या कक्षे यावा, अशी मागणी करणारा दिवाणी दावा नुकताच शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आला अहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राजेश बजाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी ऍड. तौसिफ शेख, ऍड. क्रांती सहाणे, ऍड. स्वप्निल गिरमे, सुरज जाधव आणि मोहम्मद फकी यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. दाव्याची पुढील सुनावणी 23 जूनला होणारआहे.