Bollywood News – अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जिने बॉलीवूड तसेच दक्षिण चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनय आणि टॅलेंटने यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केले. असे असले तरी तमन्नाला अनेकदा सोशल मीडियावर नकारात्मकतेचा सामना करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीत तमन्नाने याबद्दल खुलासा केला.
अलीकडेच एका मुलाखतीत तमन्नाला विचारण्यात आले की, ती सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कशी सामोरे जाते. यावर तमन्ना म्हणाली ,’माझ्या प्रोफेशनमध्ये ती जे करते ते लोकांना आवडते हे महत्त्वाचे आहे. जेव्हा माझ्यासोबत हे घडलं, तेव्हा पहिल्याच क्षणी मला आश्चर्य वाटलं आणि मी खूप अस्वस्थ झाले कारण मला खरंच असं वाटायला लागलं होतं की काय होतंय? मी चूक केली आहे का?’
‘मला पुढे कळले की मला जे बनायचे आहे ते बनण्यावर मला लक्ष केंद्रित करायचे आहे. माझ्याबद्दल बरेच लोक काय विचार करतात याची मी काळजी करू नये कारण त्यांनी माझा प्रवास कधीच पाहिला नाही आणि त्यांनी माझे आयुष्य जगले नाही त्यांना मी कोण आहे याची कल्पना नाही. ते त्यांच्या पातळीवरूनच बोलत राहतील ‘
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तमन्ना भाटिया शेवटची वेब सीरिज ‘आखरी सच’ मध्ये काम करताना दिसली. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित आणि निर्विकार फिल्म्स निर्मित, या मालिकेत अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग, दानिश इक्बाल, निशू दीक्षित, क्रिती विज आणि संजीव चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.