नवी दिल्ली – वाढती महागाई आणि मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधीवरील घटत्या व्याजदरांवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम सामान्य जनता भोगतेय, असे त्यांनी म्हटले. नुकतीच भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपातीची शिफारस करण्यात आली. त्यापाठोपाठ किरकोळ आणि घाऊक महागाईच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले. त्यावरून राहुल यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवालही त्यांनी केला. विविध मुद्द्यांवरून कॉंग्रेसकडून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केले जाते. त्यामध्ये राहुल नेहमीच अग्रभागी असतात.