एअर इंडियाकडून सरकारी संस्थांना तिकीटबंदी
नवी दिल्ली : कर्जबाजारी होऊन शेवटची घटीका मोजणाऱ्या एअरइंडिया कंपनीने आता यापुढे उधारीवर तिकिट न देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने विविध सरकारी संस्थांना उधारीवर तिकीट देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत थकबाकी दिली जाणार नाही. तोपर्यंत कंपनी क्रेडिट बेसवर सरकारी संस्थाना तिकीट देणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
Air India Spokesperson: Air India has stopped issuing air tickets to various government agencies on credit basis till the due amount is cleared. Around Rs 268 crores worth of dues are pending with different govt agencies. pic.twitter.com/pyx1kf5gUC
— ANI (@ANI) December 26, 2019
विविध सरकारी संस्थांकडे एअर इंडियाचे सुमारे 268 कोटी रुपये थकबाकी आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी मागील महिन्यात संसदेत म्हटले होते की, एअर इंडियाचे खासगीकरण न झाल्यास ती बंद करावी लागेल. यासाठी एक अनुकूल सौदा निश्चितपणे केला जाईल, असा दिलासाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिला होता.
सरकार एअर इंडियातील आपली हिस्सेदारी विकण्यासाठी दस्तावेज तयार करत आहे. निर्गगुंतवणूकीची मुदत 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या प्रयत्नात मोदी सरकारने मे 2013 मध्ये आपली 76 टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट (ईओआय) आमंत्रित केले होते. परंतु, बोलीच्या पहिल्या टप्प्यात एकाही खासगी कंपनीने रुची दाखवली नाही.