रेडा(प्रतिनिधी) – साहेब तुम्ही दिल्लीला फोन केला,आणि खताच्या किमती कमी झाल्या.तसाच एक आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना एक फोन करा आणि आम्हाला हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्या. अशी आर्त हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे म्हणाले की, देशाचे नेते पवार साहेब यांनी एक दिल्लीला फोन केला तर खताच्या किमती वठणीवर आल्या.दिल्ली तर भाजपचे सरकार आहे. परंतु राज्यात आपल्या विचाराचे पवार साहेब महाराष्ट्र राज्यात सरकार आहे.त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉल ची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे व आगामी काळात देखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे.अशी ग्वाही डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिली.
शासकीय स्तरावरूनच इंदापूर तालुक्याला पुण्यातून येणारे पाच टीएमसी सांडपाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय झाला होता.साठ गावातील शेतकरी आपण हा जो निर्णय दिला होता. या निर्णयामुळे कोरोणाची महामारी असतानादेखील, पाणी मिळणार या आशेच्या किरणाने शेतकरी खुश होता. मात्र आपल्याच पक्षाचे जलसंपदामंत्री अचानकच सोलापूर जिल्ह्याच्या दबावाला बळी पडून, चुकीच्या गोष्टी ऐकून इंदापूर तालुक्याला मिळणारे पाच टीएमसी पाणी योजना स्थगित केले आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यावर विरजण पडले आहे.
शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवार साहेब आहेत तेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतील असाही विश्वास डॉ. शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केला आहे.