नवी दिल्ली – शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावरून उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जात असताना आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनीही त्यात उडी घेतली आहे. आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेल्या काटजू यांनी पठाणसाठी होत असलेल्या गर्दीवर टिप्पणी करताना संपूर्ण देशच पागलखाना (वेड्यांचे रूग्णालय) होत असल्याची दिसते आहे असे म्हटले आहे.
पठाण गेल्या काही काळापासून वादात आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे जोरदार आवाहन विविध समाजमाध्यमांच्या द्वारे करण्यात आले होते. मात्र सगळे त्या विपरीत झाले असून पहिल्या दोनच दिवसांत या चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. सगळीकडे चित्रपटाच्या तिकिटासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यावरूनच काटजू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.