सारांश : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी एका निवडणूक सभेत पनौती हा शब्द वापरला होता. या विधानावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. या विधानावर शमीची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना पाहण्यासाठी अनेक हायप्रोफाईल लोक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते. हा सामना पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहही स्टेडियममध्ये उपस्थित होते. टीम इंडियाच्या पराभवानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका निवडणूक रॅलीत पंतप्रधानांसाठी पनौती हा शब्द वापरला होता. या विधानावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला असून भाजप नेत्यांनीही निवडणूक आयोगाकडे राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे. आता या प्रकरणावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमरोहा येथे पत्रकारांशी संवाद साधताना शमी म्हणाला, “मला वादग्रस्त प्रश्न समजत नाहीत. मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही बेसिक गोष्टींवर लक्ष द्या. गेल्या दोन महिन्यांपासून टीम इंडियानं जे कष्ट केलेत त्यावर लक्ष केंद्रित करा. हा राजकीय अजेंडा मला समजत नाही.
World Cup 2023 : पराभवानंतर शमीला रडू कोसळलं, PM मोदी थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले अन्…
शमीला पहिल्या काही सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले होते. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असताना त्याला संधी मिळाली. यावर शमी म्हणाला, “जेव्हा तुम्ही चार सामन्यांसाठी बेंचवर बसता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता. कधी-कधी तुमच्यावर दबाव येतो, पण जर संघ चांगली कामगिरी करत असेल तर त्यातून तुम्हाला समाधान मिळते.
काय आहे वाद?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती असा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. पीएम मोदी म्हणजे पनौती आहेत, भारतीय टीम (Team India) चांगलं खेळत होती, पण हे तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते. यानंतर भाजपने 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या पराभवाचा उल्लेख केला होता, तो पाहण्यासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. तसेच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
मोहम्मद शमीची विश्वचषकातील कामगिरी….
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने अवघ्या 7 सामन्यात 24 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अंतिम सामन्यातही त्याला एक विकेट मिळाली होती.