Five Reason Why India Lost 3rd T20I Against Australia : भारतीय संघाला तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत एकूण 222 धावा फलकावर लावल्या आणि तरीही सामना गमावला. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104* धावा करून भारताचा विजय हिरावून घेतला. याशिवाय या सामन्यात भारताच्या पराभवाची इतरही अनेक महत्त्वाची कारणे होती. चला तर मग जाणून घेऊया..भारताच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे
1. भारतीय संघाचा पराभव करण्यात मैदानात असलेले ‘दव’ प्रमुख कारण ठरले. मैदानावर दव असल्याने ओल्या चेंडूमुळे भारतीय गोलंदाजांना 223 धावांचा पूर्ण बचाव करता आला नाही. स्वत: सामनावीर ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने सामन्यानंतर सांगितले की, दव असल्यामुळे भारतीय गोलंदाजांना यॉर्कर टाकणे कठीण झाले होते.
2. सामन्यातील 19व्या षटकात फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी देणे ही भारतासाठी मोठी चूक ठरली. अखेरच्या तीन षटकांत ऑस्ट्रेलियाला 49 धावांची गरज होती. 18 व्या षटकात आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने केवळ 6 धावा खर्च केल्या. आता ऑस्ट्रेलियाला दोन षटकांत 43 धावांची गरज होती. पण येथे कर्णधार सूर्याने 19व्या षटकात अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला, ज्यावर मॅथ्यू वेड आणि मॅक्सवेलने जोरदार हल्ला केला आणि 22 धावा घेतल्या.
3. खराब क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. भारताकडून काही प्रसंगी झेल सोडले गेले, जसे की कर्णधार सूर्याने 18 व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला, जो मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरला. याशिवाय असे अनेक प्रसंग आले की जिथे चौकारांना रोखता आले असते, पण भारतीय खेळाडू अतिआत्मविश्वासात दिसले, याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला.
4. क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी न करू शकणे ही भारतीय गोलंदाजांची मोठी कमजोरी होती. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 21 धावांची गरज असताना प्रसिध कृष्ण क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर, मॅथ्यू वेडने स्क्वेअर लेगवर एक शॉट मारला, जिथे एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. यानंतर पुढील चेंडूवरही क्षेत्ररक्षक दिसला नाही.
Team India : राहुल द्रविड यांची मनधरणी करण्यात अखेर BCCIला यश
5. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली षटक वेळेवर पूर्ण न करणे ही टीम इंडियासाठी मोठी समस्या ठरली. षटके वेळेवर पूर्ण करू न शकल्यामुळे भारताला शेवटच्या षटकात 30 यार्डच्या आत एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला. एकूण पाच क्षेत्ररक्षकांना वर्तुळात बोलावावे लागले, त्यानंतर शेवटच्या षटकात केवळ चार क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर होते.