नारायणगाव – अवकाळी पाऊस आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांवर मोठे संकट ओढावले आहे. कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ उठवावी अन्यथा कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने ग्रासलेल्या सर्वसामान्य शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार कोल्हे यांनी चर्चेची मागणी करत असताना चर्चा न करता दोघांचही निलंबन करण्यात आले. सरकारचा निषेध करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सरकारला फक्त मन की बात’ करायची आहे, पण ‘जन की बात’ ऐकायची नाही हे दुर्दैव आहे. आजवर आणीबाणी विषयी ऐकलं होतं, पण आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.