पुसेगाव, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील कटगूण येथील ग्रामपरिवर्तन संस्था व अफार्म पुणे यांचे मार्फत हवामानाकुल अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी अभियान महिला शेतकरी मेळावा रणशिंगवाडी येथे झाला. यावेळी सेंद्रिय शेती परसबागेचे खटाव तालुक्यामधील पहिले ग्राम करण्याचा निर्धार महिलांनी केला.
यावेळी मार्गदर्शक प्रताप गोरे, सौ. किशोरी फडतरे, सौ. सोनाली मसूगडे, सचिन गिरीगोसावी यांनी सेंद्रिय शेती चे आरोग्य महत्व, अल्प खर्चिक शेती तंत्र, व उपजीविका वाढ, तसेच आर्थिक दृष्ट्या महत्व, बाजार पेठ, सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्य, शेती आरोग्य बदल इ, बाबतीत विशेष मार्गदर्शन केले. बारा महिने पिकणारा सेंद्रिय कमी पाण्यातील सांडपाणीवर आधारित प्रत्येक घरासमोर भाजीपाला परसबाग करण्याचा निर्धार सर्व महिलांनी केला.
दुष्काळ व कमी पाणी असले तरीही सांडपाण्यावर आधारित भाजीपाला लागवड तंत्र माहिती पत्रके, भिंती पत्रके. पोस्टर प्रदर्शन आयोजित केला होते. यावेळी रणसिंगवाडी येथील अशोक पोतेकर यांची सेंद्रिय मॉडेल परस बाग दाखवण्यात आली.