नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे तर दुसरीकडे देशासमोर नवे संकट उभे राहिले आहे. कोरोना लसींच्या तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्राकडे सातत्याने कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वैक्सीन की किल्लत पर राघव चड्ढा ने केंद्र को घेरा, कहा- बीजेपी बताए कि पहले भारत जरूरी या पाकिस्तान https://t.co/YPQbzxjpWE #VaccinePolitics
— Pankaj Jain (@PankajJainClick) April 9, 2021
दिल्लीतील कोरोना लसीकरण योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, दिल्लीत केवळ चार दिवस पुरेल, एवढाच लसींचा साठा आहे. पर्याप्त लसीकरणासाठी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दोनवेळा केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. राजधानीतील लसीच्या तुटवड्यावर ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लसीकरण धोरणावर टीका केली.
यातच राघव चढ्ढा म्हणाले, ‘‘देशातील आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलगंणा या सह सर्व राज्यात लसीकरण येत्या दोन-चार दिवसांत ठप्प होणार आहे. कारण लसींचा तुटवडा भासू लागला आहे.
ते पुढे म्हणाले, देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. म्हणून त्या देशाला कोरोना भारत प्रतिबंधक लस निर्यात करणार असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
तत्पूर्वी, देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राला आतापर्यंत एक कोटी ०६ लाख कोरोना लसींचे डोस पुरवण्यात आले असून, ९० लाख डोस वापरले गेले आहेत, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.